ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
विदर्भ न्युज 24 नेटवर्क
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home आपले गडचिरोली

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ*

मुख्य संपादक by मुख्य संपादक
July 6, 2025
in आपले गडचिरोली
0
*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*
Spread the love

मुंबई विशेष प्रतिनिधी दिनांक:- 6 जुलै, 2025.

‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो आपला नैतिक मार्गदर्शक. आपण कोण आहोत, हे समजून घेऊन, आपल्याला काय घडवायचे आहे, ते ठरविणे, हाच महाराष्ट्रधर्म आहे,’ अशी मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. ही मुलाखत सुप्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक – लेखक आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टि.व्ही. शो केला होता. आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.

पॉडकस्ट मालिकेचा प्रारंभ ‘महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी’ या विषयापासून झाला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रधर्म’ या विशेष पॉडकास्ट मालिकेचे हे पहिले चरण होते. यात रामायणापासून ते महाभारतापर्यंत, जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणार्‍या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायाच्या संतांपर्यंत आणि महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी या विषयांवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समाज माध्यमावरून हे पॉडकास्ट करण्यात येत आहे.

या पहिल्याच पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच यापुढेही महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी, संतभूमी, वीरभूमी म्हणून विचार आहे. या सर्वांचा धांडोळा घेतानाच, महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही म्हटले आहे.

आजच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगाने मांडणी केली. ‘महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा. सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहीली,’ अशा मांडणीमुळे पॉडकास्टचा प्रारंभ अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला. त्याला मोठा प्रतिसादही लाभला.

*महाराष्ट्राची कहाणी सुरु होते देवांच्या पावलांनी…*
महाराष्ट्राची कहाणी सुरु होते, ते देवांच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. राम वनवासात होते. त्यावेळी ज्या दंडकारण्याचा उल्लेख येतो. ते दंडकारण्य विदर्भ ते नाशिक-पंचवटी पर्यंत विस्तारले आहे. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राची भूमी आहे. विदर्भात दमयंतीची गोष्ट घडली.कोकणातील गुहांमध्ये अर्जून धान्यस्थ बसले होते, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. महाभारतातल्या रमणीय कथेचा भाग घडतो, तोही विदर्भातच. रुक्मिणीचे कौंडीण्यपूर आणि तिथून तिची भगवान श्रीकृष्णांनी केलेली सूटका, त्यासाठीचे युद्ध देखील या विदर्भाच्याच भूमित घडले. पांडव अज्ञातवासात राहीले, ते चिखलदऱ्यात. किचकाची जुलमी राजवट पांडवानी उधळून लावली. सत्याने असत्यावर मिळवलेल्या विजयाची ही रोमहर्षक कहाणी आहे. महाराष्ट्राची भूमी पुराणांमध्येही आहे. भगवान गौतम बुद्ध हे महाराष्ट्राच्या भूमीत शांततेचा संदेशाच्या रुपाने इथे पोहचले. त्यांचे शब्द संदेश लोकांनी शांतपणे आत्मसात केले. ते शब्द जपले. अजिंठ्याच्या शांत डोंगररांगामध्ये भिक्खुंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. जगाला दुःखातून मुक्त होण्याचा ज्यांनी मार्ग दाखवला त्या भगवान गौतम बुद्धांचे शब्द महाराष्ट्राने फक्त ऐकले नाहीत. त्यांना गुफांमध्ये, स्मृतीमध्ये आणि आत्म्यातही जपले. महाराष्ट्रातील दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक, संत, विचारवंत इथे आले आणि रमले. शंकराचार्यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांनी त्यांचे एक महत्वाचे पीठ करवीर पीठाच्या रुपाने स्थापन केले. इथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दूवा आहे.

*पंढरीची वारी चालती-बोलती संस्कृती*
इथल्या मातीनेच बोलायला सुरवात केली, ती संतांच्या रुपाने. तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभव पंथ जाती-पातींना नाकारणारा आहे. त्यांनी साध्या-सोप्या भाषेत शिकवण दिली. नंतरच्या काळात नम्रता आणि श्रद्धा यावर आधारलेली वारीची परंपरा आली. जगात क्वचितच अशी यात्रा असेल. जी सामाजिक समतेचा झरा बनली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना आहे. निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची सुरुवात केली. मुक्ताईंच्या ओव्या तर मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. संत नामदेवांच्या विचारांना गुरू ग्रंथसाहिबमध्येही स्थान आहे. पंजाबमध्ये आपण घुमान येथे साहित्य संमेलन घेतले. पंजाबमध्ये संत नामदेव यांच्याविषयी मोठा आदर, भक्तीभाव पाहायला मिळाला. संत एकनाथ, संत चोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई असे सर्व संत हे केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. आपली वारीची परंपरा ही चालती-बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे, जी महाराष्ट्राचे आत्मभिमान जपते आहे. हजारो वर्षांपूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता चालत राहीली. वारी न इस्लामी राजवटीत थांबली, न इंग्रजी आक्रमणात. हजारो दिंड्या या वारीत सहभागी होतात. यंदाही या वारीत देश-विदेशातून लोक सहभागी झाले आहेत. यावर्षी काहींनी या वारीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर सुरु केला आहे. हा पंढरीचा महिमा थक्क करणारा आहे.

*..मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहचली*
छत्रपती शिवाजी महाराज हे ध्येयाकरिता लढले. ते सत्तेकरिता लढले नाहीत. ते देव-देश आणि धर्माकरिता लढले. या वीर योद्ध्यांची तलवार धर्माच्या मार्गावरच चालणारी होती. त्यांचे युद्ध हे जिंकण्यासाठी नव्हते. ते चरित्र जपण्यासाठी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य राजवाड्यातील जड-जवाहिरातून नव्हे, तर आईच्या गोष्टींतून साकारले. राजमाता जिजाऊंच्या स्वप्नांनी त्यांचे मन घडवले. छत्रपती शहाजीराजेची स्वराज्य संकल्पना त्यांनी साकारली. त्यांचा राज्यकारभार नैतिकतेवर आधारलेला होता. सर्व धर्मांबद्दल आदर, मंदिर-मशिद तोडण्यास बंदी, स्त्रियांचा हे सगळे त्याकाळाच्या पुढे होते. जगात असा राजा कुठे झालेला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनीही कवी, योद्धा आणि विद्वान म्हणून स्वराज्य आणि धर्माचे रक्षण केले. प्रसंगी त्यासाठी बलिदान दिले. त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांनीही असाच पराक्रम गाजवला. त्यांना घोड्यावरून येणारे वादळ म्हटले जायचे. आयुष्यात ते एकही लढाई हरले नाहीत. बाजीराव हे छत्रपतींचे सेनापती नव्हते, ते संस्कृतीचे द्रष्टे शिल्पकार होते. त्यानंतर योद्धे म्हणून महादजी शिंदे यांनी राखेतून मराठी साम्राज्य उभे केले. त्यांनी दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या हातात दिली. शिंदे, होळकर, भोसले या मराठी माणसांनी संपूर्ण भारताचा कारभार हाती घेतला. ब्रिटीश, अफगाणांशी मुत्सद्दीपणे त्यांनी वाटाघाटी केल्या. मराठी अस्मिता जपली. राजकारणात मुत्सद्देगिरी जपली, त्याचे अधिष्ठान होते, संस्कृतीचा अभिमान. त्यांच्यामुळेच मराठा तलवार यमुनेपर्यंत पोहचली, आणि भारताच्या केंद्रस्थानी मराठा साम्राज्य पुन्हा प्रस्थापित झाले.

*धैर्यशाली नारिशक्ती..*
इथल्या धैर्यशाली स्त्रियांनाही विसरून चालणार नाही. जेव्हा साम्राज्य संकटात होते, त्यावेळी राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईं तलवार घेऊन उभ्या राहिल्या. त्यांनी औरंगजेबाला वर्षानुवर्षे थोपवून धरले. संताजी जाधव-धनाजी घोरपडेंच्या काळात इथे गवतालाही पाते फुटले. पहिल्या सेनापती उमाबाई दाभाडे यांनी नेतृत्व केले. रणनिती आखली. त्याकाळात स्त्रियांना बोलण्याची संधी नसायची, अशा काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी या भारतीय संस्कृतीतील नारीशक्तीच्या प्रतिक ठरल्या.

*महाराष्ट्र धर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटलीच नाही…!*
महाराष्ट्राने केवळ योद्धे निर्माण केले नाहीत, तर त्यांनी घडवले धर्माचे रक्षक, राष्ट्राच्या संकल्पनेचे उद्गाते आणि नव्या भारताचे शिल्पकार. महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच नाही. पण तो बदलत गेला. काळानुसार त्यांनी स्वरूप बदलले पण आत्मा कधीच बदलला नाही. महात्मा जोतिबा फुले यांनी जात, पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिले. धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला उघडपणे विरोध केला. त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी सोसलेल्या धैर्याची परिभाषाच घालून दिली. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्राला राजकीय गर्जना दिली. त्यांनी गणेशोत्सव, वृत्तपत्रे या मार्गानी त्यांनी परंपरेलाच प्रतिकारचे हत्यार बनविले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही केवळ घोषणा नव्हती, ती होती एक जनचळवळ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोध, अपमान, भेदभाव यावर बुद्धी आणि अभ्यासाने विजय मिळविला. कोलंबियामधून शिक्षण घेऊन आलेले डॉ. बाबासाहेब भारताच्या संविधानाचे शिल्पकार झाले. महाड सत्याग्रह, शिक्षणाचा आग्रह आणि जात व्यवस्थेच्या निर्मुलनाचा निर्धार हे सगळे संघर्ष नव्हते, तर नव्या भारताचे नैतिक बांधणी. याच मालिकेत पंडिता रमाबाईंनी विधवा महिलांकरिता शिक्षण आणि अधिकारांची चळवळ उभी केली. गोपाळ गणेश आगरकर यांनी रुढी आणि कर्मकांड यांना थेट प्रश्न विचारले. संत गाडगेबाबा सामाजिक स्वच्छता आणि अंतःकरणातील शुद्धतेचे सुंदर नाते जगासमोर आणले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह, शाळा उभ्या केल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला उभे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महाराष्ट्राला जीवन शिकवले. म्हणूनच महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा.सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहीली.

रिद्धपूर हे चक्रधर स्वामींच्या गुरूंचे गोविंदप्रभूंचे क्षेत्र. महाराष्ट्र शासनाने येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले आहे. याच रिद्धपूरमध्ये मराठी भाषेतील अनेक ग्रंथ तयार झाले. काही दिवसांपूर्वी या विद्यापीठाने आपले कामकाज देखील सुरु केले आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
000

Tags: #cmomaharashtra
Previous Post

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

मुख्य संपादक

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार मुख्य संपादक – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क संदीप राचर्लावार हे पत्रकारितेतील एक समर्पित, निःपक्ष आणि निर्भीड व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी “विदर्भ न्यूज 24 नेटवर्क” या डिजिटल माध्यमाची स्थापना केली, यामागील उद्दिष्ट एकच – समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या समस्या, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न शासनाच्या दरबारी पोहोचवणे. त्यांचे लिखाण सडेतोड असून सत्य आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारे आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत त्यांनी डिजिटल पत्रकारितेत नाविन्यपूर्ण प्रयोग घडवले आहेत. त्यांनी नवोदित पत्रकारांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी कार्य केलं आहे. विदर्भासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील घटनांचा अचूक आणि वेळेवर आढावा घेणारे त्यांचे वृत्तांकन आज विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे. त्यांचा पत्रकारितेतील विश्वास अगदी स्पष्ट आहे — "बातमी ही केवळ माहिती नव्हे, ती समाजपरिवर्तनाचे साधन असते." त्यांच्या नेतृत्वात "विदर्भ न्यूज 24 नेटवर्क" हे माध्यम प्रामाणिक, जागरूक आणि लोकाभिमुख पत्रकारितेचे एक मजबूत व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. संपर्क: मो. 9421729671 / 9423502555 ईमेल: sandeep.racharlasrc@gmail.com कार्यकारी संपादक * * *संजय भोयर* *082757 50589* Sandeep Racharlawar Editor-in-Chief – Vidarbha News 24 Network Sandeep Racharlawar is a dedicated, impartial and fearless personality in journalism. He founded the digital medium “Vidarbha News 24 Network”, with one goal – to bring the problems of people from all walks of life, especially farmers and the underprivileged in rural areas, to the attention of the government. His writing is straightforward and keeps truth and social interest at the center. He has created innovative experiments in digital journalism by making effective use of technology. He has done guiding and inspiring work for budding journalists. His reporting, which provides accurate and timely reviews of events in Vidarbha, Maharashtra, Telangana and Chhattisgarh, has become a symbol of credibility today. His belief in journalism is very clear — "News is not just information, it is a tool for social transformation." Under his leadership, "Vidarbha News 24 Network" has emerged as a strong platform for honest, conscious and people-oriented journalism. Contact: Md. 9421729671 / 9423502555 Email: sandeep.racharlasrc@gmail.com Executive Editor * * *Sanjay Bhoyar* *082757 50589*

Please login to join discussion

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025

Recent News

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025
विदर्भ न्युज 24 नेटवर्क

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

कार्यकारी संपादक:-संजय भोयर विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Follow Us

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Currently Playing

मुख्य संपादक संदीप राचर्लावार विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Browse by Category

  • Food
  • Gadget
  • Mobile
  • Music
  • News
  • Politics
  • Review
  • Science
  • Sports
  • Startup
  • Tech
  • Travel
  • Uncategorized
  • World
  • अग्रलेख
  • आपला सिरोंचा
  • आपले अहेरी
  • आपले एटापल्ली
  • आपले गडचिरोली
  • आपले चंद्रपूर
  • आपले चामोर्शी
  • आपले नागपूर
  • आपले विदर्भ
  • छत्तीसगड राज्य
  • तेलंगाना राज्य
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
  • विशेष संपादकीय

VN24 Visitor

5 8 7 4 8 8
Users Today : 475
Total Users : 58748873
Views Today : 549
Total views : 58767015
Who's Online : 0
Your IP Address : 216.73.216.179
Server Time : 2025-07-06
Powered By WPS Visitor Counter

Recent News

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025

‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ हे विदर्भासह महाराष्ट्र देश-विदेशातील राजकारण, प्रशासन यावर सत्य, परखड आणि निर्भीड वृत्तांकन तसेच विश्लेषणाचे एकमेव व दर्जेदार व्यासपीठ होय. ‘सत्ता, संघर्ष आणि सत्य’ याचा सखोल मागोवा घेऊन ताज्या, पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि निःपक्ष बातम्यांमधून वाचकांशी विश्वासाचे नाते तयार करणारे डिजीटल न्यूज पोर्टल म्हणून ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ ओळखले जाते. राजकारण, प्रशासन अन् देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे वस्तुनिष्ठ अपडेट्स देणे, हाच ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्कच्या’ उद्देश आहे.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

error: Content is protected !!