गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-20/02/2025
माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन 2003 पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास वृद्धींगत झाला आहे आणि माओवादाचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यात गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील मौजा पेनगुंडासह एकुण 20 गावांनी माओवाद्यांना गावबंदीचा ठराव एकमताने संमत केला होता. यामुळे शासनाप्रती गडचिरोली येथील जनतेचा असलेला विश्वास अधोरेखीत झाला आहे.
आज दिनांक 20/02/2025 रोजी उपविभाग भामरागड मधील पोस्टे कोठी अंतर्गत येणाया मौजा पोयारकोठी येथील ग्रामस्थांसाठी पोलीस दलामार्फत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन सर्वानूमते माओवाद्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे कोठी यांना सादर केला आहे, यावेळी गावातील 70 ते 75 नागरीक उपस्थित होते. यासोबतच गावातील नागरिकांनी 02 भरमार बंदूका देखील पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करुन माओवाद्यांच्या विरोधातील लढाईमध्ये आपण पोलीस दलाच्या बाजूने उभे आहोत असे आश्वासन दिले आहे. तसेच या महिण्यातच दिनांक 09/02/2025 रोजी पोस्टे कोठी येथे ग्रामस्थांसाठी घेण्यात आलेल्या जनसंपर्क बैठकीदरम्यान नागरिकांना विविध शासकिय योजनांची माहिती देऊन सदर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर बैठकीदरम्यानच मौजा मरकणार येथील नागरिकांनी एकत्रित येऊन सर्वानूमते माओवाद्यांना गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे कोठी यांना सादर केला होता. सदर बैठकीदरम्यान मौजा मरकणार येथील 55 ते 60 नागरिक उपस्थित होते.
सदर गावे ही गडचिरोली जिल्ह्राच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाया अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने भूतकाळामध्ये या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. सदर बैठकी दरम्यान पोस्टे कोठीचे प्रभारी अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या समस्या समजून घेऊन गडचिरोली पोलीस दल ठामपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले आणि शासनातर्फे राबविण्यात येणाया विविध शासकिय योजनांचे महत्व पटवुन दिले. यासोबतच माओवाद्यांची भीती न बाळगता त्यांच्या दमदाटीस न जुमानता आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करुन माओवाद्यांना कुठल्याही प्रकारची मदत न करण्याविषयी विश्वास पटवून दिला. गावकयांनी देखील यापुढे गावामार्फत माओवादी संघटनेस जेवण/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक आणि युवक माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, गावातील जंगल परिसरात माओवाद्यांना थांबू देणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे.
सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते व पोस्टे कोठी येथील प्रभारी अधिकारी श्री. शरद काकळीज यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाया गावातील नागरिकांचे विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता गडचिरोली जिल्ह्रास माओवाद मुक्त जिल्हा करण्यात प्रशासनाची अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.