सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 27 फेब्रुवारी 2026
तालुक्यातील कंबालपेठा परिसरात मागील काही दिवसांपासून जनित्र नादुरुस्त असल्याने नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत होता. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, तसेच दैनंदिन कामकाज व छोटे व्यवसाय ठप्प होत होते.
या गंभीर समस्येबाबत गावकऱ्यांनी राजेंचा निष्ठावान कार्यकर्ते मल्लन्ना संगर्ती यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. नागरिकांच्या अडचणींची दखल घेत मल्लन्ना संगर्ती यांनी तत्काळ माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.समस्येचे गांभीर्य ओळखून राजे साहेबांनी संबंधित विभागाला तात्काळ निर्देश देत नवीन जनित्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या सूचनेनुसार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कंबालपेठा परिसरात नवीन जनित्र पोहोचवले. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवे जनित्र कार्यान्वित झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला असून, आरोग्यसेवा, दुकाने व इतर दैनंदिन सेवा पुन्हा नियमितपणे सुरू झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी या त्वरित केलेल्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या वेळी परिसरातील नागरिकांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. “लोकांच्या समस्यांबाबत संवेदनशील राहून तात्काळ निर्णय घेतल्यामुळेच आज आमचा प्रश्न सुटला आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
कंबालपेठा परिसरात निर्माण झालेल्या वीजटंचाईच्या प्रश्नावर वेळेत तोडगा काढल्यामुळे राजे साहेबांबद्दल परिसरात सकारात्मक भावना निर्माण झाली असून, त्यांच्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
